पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बाप रखुमादेवीवरु विठ्ठल... (लेख)

बाप रखुमादेवीवरु विठ्ठले...        अवघ्या महाराष्ट्राला युगानुयुगे आधार देणारा बाप माणूस म्हणजे श्रीविठ्ठल! तो लडिवाळ आहे. कारुण्यसिंधू आहे. भक्तवत्सल आहे. भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देणारा, लगबगीने धावणारा 'इष्टमित्र बंधू मायबाप सखा' आहे. पतित-पावन देखील आहे. या अनाथांचा नाथ असणाऱ्या पंढरीरायाच्या भक्तीचा सुखसोहळा प्रतिवर्षी लाखो लोक अनुभवतात. परंतु हा सोहळा ज्या ज्ञानेश्वरादी संतांच्या लेखन-वर्तनातून उभा राहिला त्या संतांना घडविणाराही एक बाप माणूस आहे. तो फारसा परिचित नाही. प्रसिद्ध नाही. पण एका कठोर अभेद्य व्यवस्थेला निर्धाराने तोंड देणारा, ती व्यवस्था खिळखिळी करण्याचे सामर्थ्य स्वतःच्या मुलांमध्ये भरणारा आणि व्यवस्थेविरुद्धच्या लढ्यात बलिदान देणारा हा बापमाणूस म्हणजे विठ्ठलपंत कुलकर्णी! सनातनी ब्राह्मणी व्यवस्थेने पावन न  करून घेतलेला पतित. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या चार प्रज्ञावंतांचा काळजीवाहक प्रेमळ पिता.         तो काळ होता कर्मठ वैदिक परंपरेच्या प्रभावाचा. धर्मसत्तेचा. त्याकाळातील महाराष्ट्राची रा...

छ. शिवाजी महाराजांच्या राजनीतीचा दस्तऐवज: आज्ञापत्र (लेख)

छ. शिवाजी महाराजांच्या राजनीतीचा दस्तऐवज: आज्ञापत्र        महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला अस्मिता व अभिमान मिळवून देणारे छ. शिवराय हे अलौकिक व्यक्तिमत्त्व होते. शून्यातून विश्व निर्माण करण्याचा पराक्रम त्यांनी केला. एका पराक्रमी जहागीरदाराच्या मुलगा म्हणून सुरुवात केली आणि स्वतःचे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. हे करताना राजमाता जिजाऊ माँ साहेबांच्या प्रेरणेचा आणि राजे शहाजी महाराजांच्या संकल्पाचा त्यांना उपयोग झाला. पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची ठरली त्यांची विचारसरणी त्यांचे दृष्टिकोन. अठरापगड जातीचे गोळा केलेले मावळे, त्यांच्यामध्ये भरलेला आत्मविश्वास, या बळावरच शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले.              शिवराज्याचे वैशिष्ट्य असे की ते आधुनिक कालखंडातील लोकशाही व्यवस्थेत महत्त्वाचे वाटत आहे. शिवाजी महाराजांनी घेतलेले निर्णय स्वराज्यासाठी घालून दिलेले नियम आणि त्यांची राजनीती आजही आपणास मार्गदर्शक ठरावी अशीच आहे. या राजनीतिच्या आधारे पुढे मराठ्यांनी राज्य केले. आपले स्वराज्य अटकेपा...

एक सेल्फी मित्रासोबत (कविता)

 एक सेल्फी मित्रासोबत वाट्याचं चतकोर आयुष्य मुठीत घट्ट पकडून चालते तेव्हाही गरज असते सोबतीची मी झाडांशी बोलते पाखरांशी गाते कोकरांच्या कानात गुपित सांगते मला आवडतात रंग हिरवे पिवळे गुलाबी निळे सावळे मोरपंखी आवडतात रंगात रंगणारी माणसंही एक लालबुंद ठिपका कधीकाळी गोंदवलाय कपाळावर नकळत्या वयात.....कौतुकाने आता तो विस्तारत पसरलाय सर्वत्र सीमारेषा बनून सीतेच्या अग्निदिव्यात अन् सती सावित्रीच्या त्यागात मला दिसताहेत  अलवानी छटा हिरवे पिवळे मनभावन रंग पार हद्दपार फार फार वर्षांपूर्वी आटपाट नगराच्या काळापासून त्यांनी बसवलेत सीसीटीव्ही कॅमेरे सर्वत्र मला परिघाबाहेर पाय टाकता येत नाही तरीही एक नटखट फुलपाखरू रुंजी घालतंय सभोवती बसतंय हळूच मधुवंती खांद्यावर या माझ्या मित्रासोबत पंखाशी थोडं रेलून काढायचाय सेल्फी कधीपासून पण... व्हायरल होण्याच्या भीतीने बटन क्लिक होत नाही अजून...                           -  श्यामसुंदर मिरजकर