झुम्कुळा : सशक्त अनुभवविश्वाची कथा
झुम्कुळा: सशक्त अनुभवविश्वाची आश्वासक कथा मानवी जीवनातील असंख्य चढ-उताराचे लघु दर्शन घडविणारा लोकप्रिय वाङ्मय प्रकार म्हणजे कथा होय. मराठी कथेची एक दीर्घ परंपरा आहे. 'काळ तर मोठा कठीण आला' अशी कथा लिहिणाऱ्या हरिभाऊ आपटेंपासून 'श्रीलिपी' लिहिणाऱ्या किरण गुरवांपर्यंत अनेकविध वृत्ती प्रवृत्तीच्या लेखकांनी मराठी कथेचा पैस समृद्ध केलेला आहे. समाजाच्या सर्व स्तरांना मराठी कथेने कवेत घेतले आहे. त्यामुळेच कथा वाङ्मय अधिक लोकप्रिय दिसते. लोकांपर्यंत पोहोचलेले दिसते. साधारणत: मराठीत समृद्ध अनुभवविश्वाची वानवा आहे. अनेक लेखक स्वतःच्या धर्म, जात, व्यवसायनिष्ठ अनुभवविश्वात गुरफटलेले दिसतात. त्याच्या पलीकडे जाऊन जगण्याचा संघर्ष पेलणाऱ्या सामान्य माणसांचा प्रयास शब्दा ं त पकडणारे लेखक कमी आहेत. मराठीत आश्वासक, आशावादी कथा तुलनेने अल्प प्रमाणात लिहिली जाते. माणसाच्या जगण्यात अनेक विसंगती असतात. अनेक प्रकारच्या समस्या, अभावग्रस्तता, अन्याय वाट्याला येत असतो. त्यामुळे बहुसंख्य कथा या शोकात्म किंवा शोकांतिक झालेल्या आप...