पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मेरा कुछ सामान...

इमेज
*मेरा कुछ सामान...*      बाहेर पावसाची झड लागून राहिली आहे. दिशा अंधुक काळवंडून गेलेल्या. थंड ओला गारवा लपेटून राहिलेला. अशा वेळी मनही थोडे कातर होते. कधी कोणाची आठवण होत राहते. मन भूतकाळात हरवून जाते. अनेक गोष्टी साठून राहिलेल्या असतात. नजरेसमोरून त्या आठवणींचे चित्रफलक सरकत जातात. दीर्घ सहवासाचा खूप आतून ओढ लावणारा प्रेमभाव शब्दांत कसा पकडायचा हा नेहमीच एक अनुत्तरित प्रश्न असतो. परंतु एखादा कवी तेही नेमकेपणाने अभिव्यक्त करताे. कवी गुलजार साहेबांचे 'इज़ाजत' चित्रपटातील हे ' मेरा कुछ सामान' गीत याचाच एक सुंदर नमुना आहे.           मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है           सावन के कुछ भीगे-भीगे दिन रखे हैं           और मेरे इक खत में लिपटी रात पड़ी है           वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो           मेरा कुछ सामान... ...

पर्यावरण जाणिवा विकसित करणारी बालकादंबरी

इमेज
पर्यावरण जाणिवा विकसित करणारी बालकादंबरी                    'एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य' ही नामदेव माळी लिखित बालकादंबरी अफलातून आहे. मोठ्याने आरवणारा कोंबडा गब्रू आणि त्याच्या आवाजाचा त्रास होतो म्हणून सांगणारे वृद्ध जोडपे यांच्या संघर्षाभोवती ही कादंबरी फिरते. खेड्यातून शहरात राहायला आलेली आजी तिच्याबरोबर कोंबड्याही घेऊन येते. त्यामध्ये गब्रू हा रुबाबदार व आक्रमक कोंबडाही असतो. त्याचे मोठ्याने आरवणे कॉलनीतील शेजारच्या वृद्ध दांपत्याला त्रासदायक वाटते. त्यातून नवा प्रश्न निर्माण होतो. दिवसेंदिवस शहरांमधून संवेदनशीलता हरवत चालली आहे. प्रत्येकाला दुसऱ्याचा त्रास नको आहे. परंतु आपल्या सवयींमुळे/वागण्यामुळे इतरांना त्रास होतो, याची किंचितही जाणीव त्यांना नसते. अशा पार्श्वभूमीवर निसर्ग संवेदना, भूतदया, मानवता, जगण्याचे व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करत ही कादंबरी पुढे जाते.                गौरव हा छोटा मुलगा आणि त्याचे सृजन कट्ट्यावरील म...

परिसा भागवतांचे परिवर्तन

इमेज
परिसा भागवतांचे परिवर्तन : भक्तिसंघर्ष युगाची नांदी परिसा भागवत! अनेक गूढ प्रश्नांचे मोहोळ उभे करणारे वारकरी संत. मूळचे ब्राह्मण. ज्ञानाचा गर्व आणि अहंकार बाळगणारे. नामदेवांची शूद्र म्हणून अवहेलना करणारे. तुझे पूर्वज माझ्या पायाशी, असे म्हणणारे. पुढे हेच परिसा नामदेवाचे शिष्य झाले. तीव्र विरोध ते पक्का अनुयायी हे महापरिवर्तन कसे घडले, याचेच नवल वाटावे. हे परिवर्तन एका रात्रीत घडलेले नाही. एका भेटीत घडलेले नाही. त्याच्यासाठी दीर्घ संवाद झालेला आहे. अनेक घटना प्रसंग घडून गेलेले आहेत. त्याचे काही संदर्भ परिसा भागवतांच्या अभंगातच सापडतात आणि त्यातून या परिवर्तनाची पृष्ठभूमी कळू लागते.      भागवत हे मूळचे कर्नाटकच्या समुद्र किनारपट्टीच्या भागात राहणारे लोक. भागवत लावणे म्हणजे भक्तीच्या प्रचार प्रसारार्थ पौराणिक कथांवर बेतलेले नाट्य सादर करणे. दोन किंवा अधिक लोकांकडून हे विधिनाट्य सादर केले जायचे. याच लोकांनी नंतर भागवत हे आडनाव धारण केले. त्यांच्यापैकीच कुणीतरी एक भागवत पंढरपुरी आले आणि लोकांना रामकथा ऐकवून भक्तीचा उपदेश करू लागले. हेच परीसा भागवत!  ...