पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दैनंदिनी

त्याने वर्षारंभी ठेवली तिच्या हातावर  नवीकोरी दैनंदिनी  आणि म्हणाला,  "लिहीत जा स्वतःच्या अक्षरांनी  प्रत्येक दिवसाची कहाणी!" वर्ष उलटल्यावर  उत्सुकता म्हणून  त्याने चाळली तिची रोजनिशी  अनेक पानांवर दिसला  दूध किराण्याचा हिशेब कुणाकुणाचे वाढदिवस   लाईट बिल दूध बिल रिचार्ज  कामवालीचा हिशेब  घरादाराचे आजारपण  आणि प्रिस्क्रिप्शनच्या नोंदी  प्रारंभीच्या पानांवर पसरला होता उत्साह नंतर असंख्य पाने कोरीच  मध्येच काही थेंब पडून ओघळत गेलेली अक्षरे  दोन चित्रे फुरसतीच्या वेळात काढलेली काटेरी निवडुंगाला फुललेले अस्सल फूल एकात,  क्षितिजाचा काळानिळा पडदा भेदून  वर सरसरणारी आभा दुसऱ्यात...  इतर काहीच लिहिले नव्हते त्यात  विचारलं तर म्हणाली,  "वेळच नसतो रे...!  आता नव्याने सुरू करते लिहायला   नक्की..."                    - श्यामसुंदर मिरजकर

हेचि दान दे गा देवा...

इमेज
* जगद्गुरु तुकोबारायांच्या पसायदानातील मूल्यविवेक*         वारकरी संप्रदाय म्हणजे सामाजिक समता आणि अाध्यात्मिक लोकशाहीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बंडखोर प्रयोग होय. तेराव्या शतकात संत नामदेव-ज्ञानदेवांसह अनेक संतांनी स्वतःचे जीवन संकटात घालून भक्तीची पताका उंच धरली. ' यारे यारे लहान थोर। याती भलते नारी नर।। ' असे म्हणत स्त्री शूद्रातिशूद्रांना भक्तीचा मार्ग खुला केला आणि नव्या परंपरेला सुरुवात झाली. या संत नामदेव-ज्ञानदेव कृत भक्तिमार्गाची पाऊलवाट प्रशस्त करण्याचे कार्य नंतरच्या संतमांदियाळीने केले. त्यामुळेच 'ज्ञानेशाचा एका, कबीराचा शेखा आणि नामदेवाचा तुका' असे आदराने म्हटले जाऊ लागले. म्हणजेच संतांनी वारकरी संप्रदायाची एक दीर्घ परंपरा घडविली, टिकविली आणि पिढ्यान् पिढ्या कष्टकरी भावभोळ्या जनसामान्यांच्या मनात रुजविली.           ' नामदेवे केले स्वप्ना माजि जागे। सवे पांडुरंगे येऊनिया।।' असे तुकोबांनी स्वतःच लिहून ठेवले आहे. याचा अर्थ असा की संतांची पूर्वकालीन मांदियाळी उत्तरकालीन संतांना घडव...