छोड़ आए हम वो गलियाँ...
छोड़ आए हम वो गलियाँ... कवी गीतकार दिग्दर्शक गुलजार हे एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व. समाजाच्या वर्तमान प्रश्नावर वेगळ्या दृष्टिकोनातून भाष्य करणे ही त्यांची खासीयत. ' माचिस ' (१९९६) हा चित्रपट असाच एक वेगळा प्रयोग होता. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शिख आतंकवादी तरुणांना पकडण्याची जोरदार मोहीम हाती घेतली गेली. या प्रक्रियेत निष्पाप तरुण विनाकारण भरडले गेले. त्यांच्यावर अन्याय झाला. मग असे तरुण हिंसेच्या रस्त्यावरून पुढे गेले. अशाच भरकटलेल्या तरुणांची कहाणी म्हणजे 'माचिस' होय. काडीपेटी मधील काडीचा वापर चूल पेटवण्यासाठी होऊ शकतो, तसाच घर पेटविण्यासाठीही होऊ शकतो. हे ज्वलनशील युवक कुणाच्या हाती लागतात यावर पुढचे भवितव्य अवलंबून असते. पोलीस आणि प्रशासनाच्या अन्यायाचा बदला घ्यायचा म्हणून चार तरुण स्वतःचे घरदार, गाव सोडून आतंकवाद्यांना मिळतात. अशा घरदार सोडलेल्या तरुणांच्या ओठी एक अतिशय अर्थपूर्ण गाणे आले आहे. 'छोड़ आए हम वो गलियाँ! ' गाण्याचा हा मुखडा तसा कुणालाही लागू पडणारा आहे. एका विशिष्ट ध्येयासाठी स्वतःचे घरदार, गाव सोडलेले तरुण...