पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संत नामदेवांची अभंगवाणी आणि संवैधानिक मूल्ये (लेख)

इमेज
नामदेवांची अभंगवाणी आणि संवैधानिक मूल्ये        वारकरी संप्रदायाचे प्रथम संत, आद्य अभंगकार, वारकरी कीर्तनाचे उद्गाते संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचा जन्म २६ ऑक्टोबर, १२७० चा! 'नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी' म्हणत त्यांनी दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू आणि उत्तरेकडील गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाब या प्रांतांची यात्रा केली. आंतरभारती एकतेचा पाया रचला. 'आम्हा सापडले वर्म, करू भागवत धर्म' अशी घोषणा करत नवा काल सुसंगत आचारधर्म, संप्रदाय स्थापन केला. या लोकोत्तर राष्ट्रीय संतांची तिथीप्रमाणे येणारी ७५० वी जयंती योगायोगाने संविधान दिनी म्हणजे २६ नोव्हेंबर, २०२० रोजी येत आहे.        आदर्श मानवी मूल्यांची जपणूक, लोकाभिमुख शासन प्रशासनाची निर्मिती व सार्वभौम एकात्म राष्ट्रभावनेचा विकास करणारा महाग्रंथ म्हणजे भारतीय संविधान! जी राष्ट्रनिर्माणाची तत्त्वे आणि जे मूलभूत अधिकार संविधानाने स्थापित केले, त्यांचा उद्घोष संत नामदेवांच्या अभंगवाणीत आणि पर्यायाने वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानात सातशे वर्षांपूर्वी पहा...