पोस्ट्स

जुलै, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सणकांडी मुक्ताई

इमेज
 * सणकांडी मुक्ताई *       इ. स. १२९०-९१ च्या दरम्यानची गोष्ट. पंढरपुरात नामदेव नावाचा एक २० वर्षांचा तरुण हरिभक्त अभंग लेखन, भजन-कीर्तन या माध्यमातून ख्यातकीर्त झाला होता. समविचारी लोकांचा मेळा जमवण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. श्रीविठ्ठलाची भक्ती आणि आषाढी कार्तिकी वारी यामुळे पंढरपूर एक जागते तीर्थक्षेत्र बनले होते. याच दरम्यान पंढरपुरात आळंदी-पैठण इकडून येणाऱ्या भक्त मंडळींकडून एक वार्ता पोहोचली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई नावाच्या चार भावंडांना ब्राह्मणांनी वाळीत टाकले आहे. परंतु ही नाथपंथी भावंडे बुद्धिमान आहेत. वेदशास्त्र, उपनिषद, पुराणांचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. त्यांनी पैठणच्या ब्रह्मवृंदांशी शुद्धिपत्र मिळविण्यासाठी वाद घातला आहे. तेथील ब्राह्मण थक्क झाले आहेत. परंतु या भावंडांना शुद्धिपत्र मिळालेले नाही. त्यांनी वेदान्तावर व्याख्यान दिले. पुराण सांगितले. इतकेच नव्हे तर कव्ययज्ञात अस्खलितपणे मंत्रोच्चाराने पितरांना आवाहन केले. त्यांच्या अलौकिक वाणीने, प्रतिभेने जन वेडावले आहेत. पुढे त्या भावंडातील ज्ञानदेवाने गीतेव...

सत्यशोधकीय नियतकालिके

इमेज
सत्यशोधकीय नियतकालिके - वाङ्मयेतिहासात मोलाची भर घालणारा संदर्भ ग्रंथ डॉ. श्यामसुंदर मिरजकर All things must be examined, debated, investigated without exception and without regard for anyone's feelings. - Denis Diderot       फ्रेंच तत्त्वज्ञ आणि विश्वकोशाचा सहसंकल्पक डेनिस डिडेरॉट (1713-1784 ) यांचे वरील विधान बुद्धिप्रामाण्य आणि सत्यनिष्ठा यांना अधोरेखित करणारे आहे. भारतातही 'प्रत्यक्षम् एवम् प्रमाणम्।' म्हणणार्‍या चार्वाकांपासून ही चिकित्सा जबर किंमत मोजूनही अव्याहत चालू आहे. ग्रंथप्रामाण्य, शब्दप्रामाण्य, परंपराप्रामाण्य यांना शह देण्याचा प्रयत्न मध्ययुगात नाथ-महानुभाव-लिंगायत-वारकरी यांनी केला. त्याला मर्यादित क्षेत्रात व ठरावीक कालखंडात यशही मिळाले. परंतु राजसत्ता ही सनातनी धर्मव्यवस्थेशी बांधील असल्याने या संप्रदायांना सामाजिक व्यवस्थेत मोठे फेरबदल घडवून आणता आले नाहीत.       इंग्रज राजवटीत सनातन्यांचा अधिक्षेप सुरू झाला. त्रैवर्णिक पुरुषांपुरतेच मर्यादित असलेले ज्ञान काही प्रमाणात बहुजनांना खुले झाले. त्यातूनच सामाजिक क्रांतीचे प्रणेते जोतीराव फु...