पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आंबेडकरी विचारविश्वाचे काव्यात्म चिंतन : युगानुयुगे तूच

इमेज
*आंबेडकरी विचारविश्वाचे काव्यात्म चिंतन : युगानुयुगे तूच* “Art is not created in a vacuum. It is the work not simply of a person, but of an author fixed in time and space, answering a community of which he is an important, because of articulate part.”               - Wilbur Scott          कोणतीही कलाकृती स्वयंभू असत नाही. ती ज्या काळात प्रकटते त्या काळाचे असंख्य दबाव कवीवर आणि पर्यायाने कलाकृतीवर असतात. कवी त्याच्यासमोर उपलब्ध असणाऱ्या प्रदीर्घ अवकाशातून जे रचित निर्माण करतो ते समकालीन समाज-सांस्कृतिक पर्यावरणाला दिलेल्या भेदक प्रतिसादाच्या रूपाने व्यक्त होते. ज्या कविता विचार पक्ष घेऊन पुढे येतात, त्या बहुतांशी समाज-संस्कृतीचा ताणाबाणा घेऊनच येतात. अजय कांडर यांची 'युगानुयुगे तूच' ही दीर्घकविता याच पद्धतीची आहे.      मराठीत दीर्घ कविता लेखनाची मोठी परंपरा आहे. त्याच प्रमाणे कवी यशवंत मनोहर, ज.वि.पवार, नामदेव ढसाळ, अरुण काळे, रवींद्र श्रावस्ती अशा ...

संत बहेणाबाई : वैराग्य विवेकाचा ज्ञानदीप

इमेज
*संत बहेणाबाई : वैराग्य विवेकाचा ज्ञानदीप*      प्रपंचाच्या खडतर मार्गावरून वाटचाल करत वारकरी संप्रदायातील विवेकदीप शोधणाऱ्या संत कवयित्री म्हणून बहेणाबाई यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संत तुकाराम हे या संप्रदायाचे कळस असतील, तर बहेणाबाई त्यावरील फडकती ध्वजा आहे. ब्राह्मण परिवारात झालेला जन्म. अगदी बालपणी म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षी झालेला विवाह, तोही तीस वर्षांच्या एका बिजवराशी. पती म्हणजे साक्षात जमदग्नीचा अवतार. शीघ्रकोपी. घरची अत्यंत गरिबी. भिक्षुकी करून उदरनिर्वाह चाललेला. असे असले तरी वर्णजाती अभिमान आणि पुरुषी वर्चस्वभावना ओतप्रोत भरलेली. रोजचा दिवस म्हणजे अग्निदिव्य, असे प्राक्तन असताना बहेणाच्या मनी अध्यात्माची तीव्र ओढ जागते. कथा प्रवचनात तिचे मन रमते. ती देवलसी आहे, असे सगळे म्हणतात. भजन कीर्तनात दंगणारी, सात्त्विक आचरण करणारी, मनाने हळवी, प्रांजळ आणि भावनाशील असणारी बहेणाबाई भक्तीचे खरे वर्म शोधू लागते. तिला ते सापडते कोल्हापुरात जयराम स्वामी यांच्या कीर्तनात. जयराम स्वामींनी आपल्या कीर्तनात तुकोबांची महती गायलेली असते. त्यांची वचने उद्धृत ...

भाषांतरमीमांसा आणि तिचे उपयोजन

इमेज
भाषांतरमीमांसा आणि तिचे उपयोजन Criticisim of translation quality should be grounded on thorough analysis and description. Some critics prefer to eschew value judgements, prefer not to proclaim one translation better than another (Hatim and Mason 1990b: 1)       भाषांतर ही मूलतः द्वैभाषिक प्रक्रिया आहे. बऱ्याच वेळेला भाषांतर आणि अनुवाद हे दोन शब्द एकाच अर्थाने वापरलेले आढळतात. वस्तूतः, या दोन भिन्न संज्ञा आहेत. अनुवाद ही व्यापक संज्ञा असून भाषांतर हे अनुवादाचे एक अभिन्न अंग आहे. संस्कृत साहित्यात अनुवाद हा शब्द फार पूर्वीपासून वापरला जातो. या संज्ञेचा मूळ अर्थ पाठोपाठ उच्चारणे, असा आहे. न्याय सूत्राच्या दुसऱ्या अध्यायातील प्रथम आह्निकम् मध्ये 'विधिविहितस्य अनुवचनम् अनुवादः।' १.६६ असे सूत्र येते. वैदिकांनी वैध म्हणून मान्यता दिलेल्या अनुवचनांचा अनुवाद केला जावा, असे येथे म्हटले गेले आहे. इथे अनुवाद याचा अर्थ पाठोपाठ म्हणणे, विश्लेषण करणे, अन्वय लावणे, स्पष्टीकरण किंवा विस्तार करणे, असा अभिप्रेत आहे. 'पूर्वसिद्ध मजकुराचे स्पष्टीकरण विवरण अथवा विस्तार ...