पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

#जिहाल-ए-मस्कीं मकुन-ब-रन्जिश (लेख)

इमेज
https://youtu.be/QYiTtuwJzTQ?si=QmKkYIuR6go7JjAI *# जिहाल-ए-मस्कीं मकुन-ब-रन्जिश *          गुलजार साहेबांच्या अनेक गाण्यांचे गारुड आजही मनावर बसलेले आहे. भावनांच्या सूक्ष्मछटा अत्यंत नजाकतीने शब्दांत पकडणारा हा कवी कितीतरी पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे. 'गुलामी' (१९८५) या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेले एक गाणे आजही वेगळीच आनंदोर्मी देऊन जाते. खरे तर या गाण्यातील पहिल्या दोन ओळी बिलकुल कळत नाहीत. कारण त्या फारसी भाषेमध्ये आहेत. परंतु अर्थशोध घेता घेता आपणाला त्या शब्दांच्या मधुर भावछटांपर्यंत पोहोचता येते. लेखक दिग्दर्शक जे.पी. सिप्पी यांचा हा चित्रपट जातिभेद आणि सरंजामशाही या देशातल्या महत्त्वाच्या समस्यांवर प्रकाश टाकणारा. हा चित्रपट राजस्थानच्या वाळवंटी भागात चित्रित झालेला. धर्मेंद्र, मिथुन चक्रवर्ती, नसरुद्दीन शाह, स्मिता पाटील, कुलभूषण खरबंदा, रीना रॉय, अनिता राज असे नावाजलेले कलाकार या चित्रपटामध्ये भेटतात.            गावातील उच्चवर्णीय ठाकूर आणि हलके समजले जाणारे चौधरी जाट यांच्या मूल्यात्मक संघर्षाची ही क...

मी रात टाकली...

इमेज
मी रात टाकली...       चांगला कवी नेहमीच कमीत कमी शब्दांत आपला आशय व्यक्त करतो. अर्थाच्या अनेक शक्यता शब्दांत आणि त्या दरम्यानच्या मोकळ्या जागांमध्ये पेरत जातो. आपल्या मनातील भावभावना व्यक्त करण्यासाठी अतिशय चपखल अर्थपूर्ण शब्द गवसणे आणि त्यांची अनोखी मांडणी करणे, हेच कवीचे वैशिष्ट्य असते. ना.धों. महानोरांनी ' जैत रे जैत ' (१९७७) या चित्रपटासाठी लिहिलेले 'मी रात टाकली' हे गीत याच पठडीतले आहे. गो. नि. दांडेकरांच्या कथेवर जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरला होता. या गीताला संगीत दिले आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी, तर स्वर आहे लता मंगेशकर, रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे यांचा.        ना. धों. महानोर यांनी अतिशय कमीत कमी शब्दांत एक अनवट भाव पकडला आहे. ठाकर आदिवासी जमातीतील चिंधीची ही कहाणी. चिंधीला आपला भित्रा व दारुबाज नवरा आवडत नाही. म्हणून ती त्याच्याबरोबर काडीमोड घेते. जमातीच्या कायद्याप्रमाणे चिंधीच्या बापाला देज (हुुंडा) परत द्यावे लागते, पण चिंधी एका नको असलेल्या पाशातून मुक्त होते. तिची भ...