पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आप की आँखों में कुछ...

इमेज
      आप की आँखों में कुछ...          प्रेम ही सौंदर्यात्मक भावना आहे. हे सौंदर्य असते मनाचे, आदरयुक्त आत्मीयतेचे. ते व्यक्त होताना मात्र शारीर संकेतांच्या स्वरूपात दिसू लागते. उत्फुल्ल स्वरूपात प्रकटते. अंतरंगात कमलिनी सारखे उमलणारे प्रेम नजरेतून स्रवते. हसण्यातून दरवळते. लयबद्ध हालचालीतून ओसंडते. या प्रेमभावनेचे वर्णन करताना अनेक कवी देहसौंदर्याचे वर्णन करतात. परंतु त्या सुंदर दिसणाऱ्या देहामध्ये तितकेच सुंदर मन आहे, हे विसरतात. कवी गुलज़ारजींनी मात्र एका गाण्यात बाह्य सौंदर्याबरोबरच आंतरिक सौंदर्याचेही वर्णन केले आहे.         पाणीदार, गहनगहिरे डोळे हे सौंदर्यही आहे आणि भावनांची आरासही! डोळे खूप काही सांगून जातात, फक्त ते वाचता आले पाहिजे. अपेक्षा अशी असते की आपल्या प्रियवराने न सांगताही आपल्या भावना समजून घ्याव्यात. त्या भावभावना जाणून घेण्याचा एकमेव मार्ग असतो डोळे! ज्याला ही डोळ्यांची भाषा कळते त्याला मनातील हर्षखेदही कळतात. त्यातूनच सहजीवनाची रंगत वाढत जाते. म्हणूनच 'घर' चित्र...

मेरी आवाज़ ही पहचान है

इमेज
मेरी आवाज़ ही पहचान है       मानवी जीवन म्हणजे अकल्पित वास्तवाचा पसारा. जे आज आहे ते कायम असेलच असे नाही. जे हवे असते ते मिळेलच असेही नाही. सगळ्याच गोष्टी अनित्य. सतत बदलणाऱ्या. जे हवेसे असते ते आपल्या नजरेसमोरून हरवून जाते. जे समोर येते ते सहजपणे स्वीकारता येत नाही. हाच काळाचा नियम आहे.      आयुष्य नेहमीच माणसाशी खेळ खेळत असते. ते कधी कधी आवडत्या व्यक्तींना लपवून ठेवते आणि त्या ठिकाणी दुसऱ्याच व्यक्तींचा प्रवेश होतो. खरे तर एका व्यक्तीची जागा दुसरी व्यक्ती कधीच घेऊ शकत नाही. काहीतरी उणेदुणे असतेच. तरीही एक तडजोड म्हणून, आयुष्याने आपल्यासमोर ठेवलेला पर्याय म्हणून, जे वाट्याला आले ते स्वीकारावे लागते. मग सुरू होतो नव्यामध्ये जुने शोधण्याचा खेळ. आधाअधुरा. पूर्णत्वाचे समाधान कधीच न देणारा. भूतकाळाची पडछाया नेहमीच वर्तमानावर पडलेली असते. त्या सावल्या मनभर रेंगाळतात. हृदयाशी घट्ट बिलगून बसतात. त्याच वेळी दुसरा आश्वासक स्वरही कानावर पडत असतो. जीवनाचा प्रवाह कधीच एका ठिकाणी थांबत नाही. म्हणूनच नव्याला स्वीकारावे लागते. त्याच वेळी कानावर काही जुने...

इस मोड़ से जाते हैं...

इमेज
इस मोड़ से जाते हैं...      ' आंधी ' (१९७५) हा गुलज़ारजीनी लिहिलेला व दिग्दर्शित केलेला चित्रपट जीवनाच्या अकल्पित प्रवासाबद्दल खूप काही सांगून जातो. संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांच्या मुख्य भूमिका असलेेला हा चित्रपट. या चित्रपटातील गाणी त्या काळात गाजली होती. त्यामधील मनात घर केलेले एक गाणे म्हणजे 'इस मोड़ से जाते हैं...'         मानवी जीवन अनेक चढउतारांनी भरलेले आणि अनेक वाटा-वळणे असलेले असते. कधी कधी जीवनात असे वळण येते की, त्यामुळे पुढचा रस्ताच बदलून जातो. आणि जो रस्ता आपण निवडतो तो आपल्याला संकल्पित मुक्कामापर्यंत घेऊन जातोच असे नाही. तरीही चालणे थांबवता येत नाही. ज्या रस्त्यावरून आपण चालतो तो रस्ता नाकारता येत नाही.        जीवनातील वळणबिंदूपासून पुढे जाताना धीम्या गतीने स्वतःच्या तंद्रीत पुढे जाणारा एक रस्ता लागतो. त्याच वेळी वेगात धावणाऱ्या दुसऱ्या वाटाही लागतात. कोणत्या रस्त्यावरून जायचे ते आपल्यालाच ठरवायचे असते. धीम्या गतीने जाताना जीवनाचा आनंद घेता येतो. हवे तिथे थांबता येते. रस्त्याचा आणि आजूबाजूचा परिसर न...

ना जिया लागे ना...

इमेज
 ना जिया लागे ना...       प्रेम म्हणजे अद्भुत जीवनरस! अखंड वाहता. प्रवाही. निर्झरासारखा झुळझुळणारा. त्याचा मंद स्वर जीवनसंगीत बनून राहतो. जगण्याला नवी उमेद, नवी ऊर्जा देतो. प्रेम परिसासारखे असत नाही. एकदा परिसाचा लोखंडाला स्पर्श झाला आणि त्याचे सोने झाले, की मग परिसाचे कामच संपले. असे प्रेमाच्या बाबतीत असत नाही. प्रेम निरंतर हवे हवेसे असते. ते नित्यनूतन असते. समंजस आणि प्रगाढ प्रेमाची गोडी दिवसेंदिवस अधिक मधुर होत जाते.       या प्रेमाच्या अनेक तऱ्हा असतात. अनेक छटा असतात. ते कधी भांडणातून, कधी रुसण्यातून, कधी विरहातूनही व्यक्त होते. सहचराचा अल्पकालीन विरह देखील कधी कधी असह्य होतो. मन कुठेच लागत नाही. देह कामात गुंतलेला आणि मन बावरे झालेले, अशी अवस्था होते. अनामिक हुरहुर जीवाला लागून राहते. अस्वस्थता आणि अधीरता यांनी मन व्याकूळ होते. नजर पुन्हा पुन्हा येणाऱ्या वाटेकडे लागून राहते.          कवी गुलजार यांनी ही भावस्थिती एका गाण्यात नेमकी पकडली आहे. ' आनंद ' (१९७१) चित्रपटातील ...