पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बीती ना बिताई रैना...

इमेज
बीती ना बिताई रैना...              वेदना हे जीवनाचे अभिन्न अंग आहे. ज्या पद्धतीने जगावे असे वाटते, तसे जीवन वाट्याला येईल याची कोणतीच शाश्वती नसते. विशेषतः अगदी हृदयाजवळ असणारी प्रिय माणसे नेहमीच सोबत हवी असतात, परंतु काळ कठोर असतो. तो कधी कोणाला कोणत्या पद्धतीने आपल्यापासून दूर करेल, हे सांगता येत नाही. मग अशा दुरावलेल्या प्रियजनांच्या आठवणी शिल्लक राहतात. विरहाची कधीच न विझणारी वेदना अंत:करणात जळत राहते. आपले प्रिय म्हणजे जणू आपले प्राणच! हे प्राण निघून गेल्यानंतर उरते ते फक्त शरीर. या विरहकाळात दिवस कसाबसा निघून जातो, परंतु रात्र अधिक अंधारी होते. भिवविते. निराशेच्या खोल गर्तेत घेऊन जाऊ पाहते.      गुलजारजींनी ' परिचय '(१९७३) चित्रपटासाठी लिहिलेले प्रस्तुत गाणे म्हणजे वेदनेचा कातर करून सोडणारा स्वर आहे. शास्त्रीय संगीतात रममाण झालेला जमीनदाराचा मुलगा नीलेश (संजीव कुमार) आपला छंद हट्टाने जोपासतो. त्यासाठी त्याला वडिलांची हवेली सोडावी लागते. तो संगीत शिकतो आणि अकस्मात संगीतगुरूच्या मृत्यूनंतर त्य...

प्रियाराधन

इमेज
* प्रियाराधन *       प्रेम ही एक नैसर्गिक भावना आहे. अवघं जीवन सौंदर्यपूर्ण आणि सुखावह करण्याचं सामर्थ्य या भावनेत असतं. तरल आणि संवेदनशील मन, अखंड उत्साह हे प्रेमाचं खरं अधिष्ठान! जगण्यावरचा आणि स्वतःवरचा विश्वास अनंत पटीने वाढविण्याचं काम हे प्रेम करतं. त्यामुळेच भारतीय काव्यशास्त्रातील रसविचारात शृंगाररसाला रसराज म्हटलं आहे.         तो आणि ती यांच्यामध्ये प्रथम आकर्षण वाटतं. मग सहवास वाढतो. नंतर प्रेमभावना दृढ होत जाते. निसर्गातही अनेक ठिकाणी या प्रेमभावनेचे सुरेख आणि हृदयंगम दर्शन घडत असतं. निसर्गात म्हणजेच प्राणी, पक्षी, झाडं, वेली यांच्यामध्ये विणीचा विशिष्ट हंगाम असतो. तो काही प्रजातींमध्ये वर्षातून एकदा किंवा दोनदाही असतो. या विणीच्या हंगामात प्राणीपक्षी अधिक सुंदर, आकर्षक, सामर्थ्यवान दिसू लागतात. अंतरंगात उसळून आलेल्या प्रेमाच्या उर्मी त्यांच्या जगण्या वागण्यात नवचैतन्य निर्माण करतात. त्यामुळे मदमस्त होऊन हे प्राणीपक्षी प्रियवराच्या शोधार्थ फिरू लागतात. सजगपणे निसर्गाचे अवलोकन केले तर एक गोष्ट आपणास जाणव...

दिल ढूंढ़ता है

इमेज
दिल ढूंढ़ता है        प्रेम ही एक उत्कट सदाबहार अनुभूती आहे. प्रेम व्यक्त करायला आणि अनुभवायलाही वेळ द्यावा लागतो. एकमेकांसोबत तासन् तास, दिवसच्या दिवस फुरसतीत घालवावे लागतात. थोडे रुजू द्यावे लागते, थोडे मुरू द्यावे लागते. मग प्रेमानुभूतीत अंत:करणातली गोडी उतरत राहते. परस्परांच्या प्रेमात घालविलेले मधुर दिवस आणि जागवलेल्या रात्री यांची गोडी अवीट असते. माणसाच्या जीवनातील अनमोल ठेवा असतात या आठवणी! नंतर पुन्हा पुन्हा त्या जुन्या उत्कट आठवणीत मन रमून जाते. त्या आठवणींचे मोल, त्याची गोडी, त्याचे सौंदर्य फक्त ते अनुभवणाऱ्यालाच अधिक सखोलतेने जाणवत राहते. कधीच संपू नयेत असे हे अनमोल क्षण असतात. परंतु जीवनव्यवहारात इतरही जबाबदाऱ्या असतात. त्यामध्ये हे सोनेरी क्षण हरवून जातात. काळ भरभर पुढे सरकतो. मग  उरतात त्या फक्त आठवणी! भाव मधुर क्षणांच्या! जिवलग सहचरांच्या!         कवी गुलजार यांनी एका सदाबहार गीतातून ही अनमोल अनुभूती पकडली आहे. उर्दूचे महाकवी मिर्झा गालिब हे गुलजारजींचे आवडते शायर आहेत. त्यांच्या एका शेरन...

हज़ार राहें

इमेज
हज़ार राहें        चित्रपटामध्ये काही गाणी स्वतंत्र असतात, तर काही गाणी घटना प्रसंगांवर बेतलेली (Theme song) असतात. अशा गाण्यांमध्ये चित्रपटाचा सार सामावलेला असतो. 'थोडी सी बेवफाई' या चित्रपटात गुलजारजींनी लिहिलेले एक गीत अशाच धाटणीचे आहे.         प्रेम आणि अहंकार या गोष्टी एकत्र नांदू शकत नाहीत. काही वेळेला चुकीच्या गोष्टीसाठी केलेला हट्ट देखील प्रेमभावनेला धक्का पोहोचवतो. खरे तर प्रेमात पडल्यानंतर परस्परांच्या स्वभावातले दोष कमी व्हायला हवेत. दोन जिवलगांनी आपल्याला नको वाटणाऱ्या, बोचणाऱ्या गोष्टी हळुवारपणाने परस्परांना सांगायला हव्यात. आणि त्या कमी व्हाव्यात यासाठी प्रयत्नही करायला हवा. काही वेळेला पती-पत्नीच्या प्रेमात बाधक ठरते ते माहेरचे चुकीच्या गोष्टीसाठी दिले गेलेले पाठबळ. राग, गैरसमज, ताठा या गोष्टींमुळे एकमेकांवर प्रेम असूनही दोन प्रेमी जीव एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात. त्यामुळे रंगाचा बेरंग होऊ शकतो.        ' थोड़ी सी बेवफाई ' (१९८०) हा चित्रपट देखील अशाच गृहकलहावर बेतलेला आहे...