बीती ना बिताई रैना...

बीती ना बिताई रैना... वेदना हे जीवनाचे अभिन्न अंग आहे. ज्या पद्धतीने जगावे असे वाटते, तसे जीवन वाट्याला येईल याची कोणतीच शाश्वती नसते. विशेषतः अगदी हृदयाजवळ असणारी प्रिय माणसे नेहमीच सोबत हवी असतात, परंतु काळ कठोर असतो. तो कधी कोणाला कोणत्या पद्धतीने आपल्यापासून दूर करेल, हे सांगता येत नाही. मग अशा दुरावलेल्या प्रियजनांच्या आठवणी शिल्लक राहतात. विरहाची कधीच न विझणारी वेदना अंत:करणात जळत राहते. आपले प्रिय म्हणजे जणू आपले प्राणच! हे प्राण निघून गेल्यानंतर उरते ते फक्त शरीर. या विरहकाळात दिवस कसाबसा निघून जातो, परंतु रात्र अधिक अंधारी होते. भिवविते. निराशेच्या खोल गर्तेत घेऊन जाऊ पाहते. गुलजारजींनी ' परिचय '(१९७३) चित्रपटासाठी लिहिलेले प्रस्तुत गाणे म्हणजे वेदनेचा कातर करून सोडणारा स्वर आहे. शास्त्रीय संगीतात रममाण झालेला जमीनदाराचा मुलगा नीलेश (संजीव कुमार) आपला छंद हट्टाने जोपासतो. त्यासाठी त्याला वडिलांची हवेली सोडावी लागते. तो संगीत शिकतो आणि अकस्मात संगीतगुरूच्या मृत्यूनंतर त्य...