पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वैशाखाचे देणे (ललित लेख)

इमेज
*वैशाखाचे देणे*       नवे धान घरात आल्यामुळे कुणबी कास्तकारांच्या चेहऱ्यावर पसरलेली खुशी आणि अंगाची लाहीलाही करणारा दाहक उन्हाळा अशी वैशाखाची दोन रूपे मला दिसतात. पर्यावरणाच्या बिघडलेल्या संतुलनामुळे अलीकडे उन्हाळा भयावह दाहक वाटू लागला आहे. वाढत्या उष्णतामानामुळे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळले आणि तेथे हजारो वर्षे शीतनिद्रेत असणारे विषाणू जलस्रोतात मिसळले, तर भविष्यात मानवाला नव्या संकटाला सामोरे जावे लागेल, असा धोक्याचा इशारा आत्ताच शास्त्रज्ञ देऊ लागले आहेत. यावरचा एकच उपाय आहे, तो म्हणजे पृथ्वीवरचे हिरवे आच्छादन वाढविणे.       वैशाखात उन्हाची दाहकता असह्य होते. वैशाखवणवा असा शब्दप्रयोग त्यासाठी केला जातो. तो दोन अर्थांनी सयुक्तिक आहे. एक तर या काळातले उन्ह त्वचादाह (सनबर्न) विकार निर्माण करते. काही भागात उन्ह इतके तीव्र असते की अनेकांचे डोळे लालभडक होतात. कडक उन्हाने भोवळ येणे, अपस्मार होणे, क्वचित मृत्यूला सामोरे जावे लागणे असेही प्रकार घडतात. दुसर्‍या बाजूला निसर्गातले जलस्रोत वाटू लागतात. प्राणी पक्षी तहानेने व्याकूळ...

संतसाहित्याचे अध्ययन आणि विविध अभ्यासपद्धती

इमेज
संत साहित्याचे अध्ययन आणि विविध अभ्यास पद्धती        मराठी साहित्याचा प्रारंभबिंदू हा संतसाहित्याचा आहे. साधारणतः अकराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत मराठीत मोठ्या प्रमाणात संतसाहित्य लिहिले गेले. महानुभाव, वारकरी व समर्थ या तीन संप्रदायात मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती झाली. या बरोबरच शैव, नाथ, जैन अशा परंपरेतूनही काही प्रमाणात साहित्य निर्मिती झाली. या सर्व प्रवाहातील सर्वात प्रभावी साहित्य परंपरा ही वारकरी आहे. ती प्राधान्याने पद्य साहित्याची आहे. त्या खालोखाल महानुभाव साहित्य प्रभावी आहे. ते गद्य-पद्य या दोन्ही स्वरूपात आहे.        सुमारे सातशे वर्षे मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह हा संतसाहित्याने व्यापला होता. त्यानंतर पंडित कवी व शाहिरांची परंपरा सुरू झालेली दिसते. पुढे एकोणिसाव्या शतकात इंग्रजीच्या प्रभावातून मराठीत अर्वाचीन गद्य-पद्य साहित्याला प्रारंभ झाला, असे म्हणता येते. इंग्रजांनी शिक्षणाच्या माध्यमातून भारतीयांच्या मनामध्ये नवी मूल्यदृष्टी रुजविली. तसेच ख्रिश्चन धर्माचा पुरस्कार करताना हिंदू परंप...