पोस्ट्स

मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दिल हूम हूम करे...

इमेज
दिल हूम हूम करे...        राजस्थानचे वैराण वाळवंट तिच्या डोळ्यात उतरलेलं आहे. तिचे डोळे कोरडे ठक्क. त्या वाळवंटासारखेच. थोडाही ओलावा नाही. ती शनिवारी जन्मली म्हणून शनिचरी. तिचा जन्म झाला आणि बाप मेला. आई नौटंकीवाल्या बरोबर पळून गेली. म्हणून ती कलमुही. असेच कुणीतरी लहानाचे मोठे केले. एका दारुड्याने तिला पैजेत जिंकले आणि तिच्याशी लग्न केले. तिला एक मुलगाही झाला, तो बुधवा. दोन वेळचं अन्न कधी नीट मिळालं नाही. खालच्या जातीची, तशात अपशकुनी म्हणून अवहेलना अपमान नेहमीचाच.      अशातच एकदा दूर वरून पाणी घेऊन येत असताना तो भेटतो. ती वाळवंटातून लांबून थोडे पाणी माठातून आणतेय. तो उंटावरून चाललाय. तिला थांबवून पाणी मागतोय. तिला वर बघून बोल म्हणतोय. नजरेत नजर मिळवायला सांगतोय. तो लक्ष्मणसिंग ठाकूर आहे. जमिनदार. उच्च जातीचा. श्रीमंत. उंच हवेलीत राहणारा. ती दरिद्री. कमजात. ती त्याला पहिल्याच भेटीत आवडते.         तो तिला हवेलीत कामाला यायला सांगतोय. ती येते. तो तिला एकटीला गाठून आपला प्रेमभाव व्यक्त करतोय. तिला स्पर्श करतोय. नवरा मुलाला स...

संत तुकारामांचे आधुनिक भाष्यकार

इमेज
संत तुकारामांचे आधुनिक भाष्यकार        वारकरी ही एक जीवनप्रणाली आहे. संत हे या जीवनप्रणालीचे शिल्पकार आणि संत तुकाराम हे या जीवन प्रणालीचे संस्कृतिपुरुष! व्यक्तीला स्थळ काळाच्या मर्यादा असतात, परंतु त्याने निर्माण केलेले साहित्य आणि त्याचे जीवितकार्य या मर्यादा पार करून सर्वदूर पसरलेले असते. संत तुकारामांनी अनुभवप्रामाण्य स्वीकारून भक्तीच्या प्रांतात जे अलौकिक कार्य केले त्यामुळे उत्तरोत्तर महाराष्ट्राचा लोकधर्म घडत गेला. महाराष्ट्राची संस्कृती वारकरी संप्रदायाने व्यापलेले असल्यामुळे या संप्रदायातील कळस असणारे तुकोबा अनेक पिढ्यांना मार्गदर्शक आणि प्रेरक राहिले आहेत. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवितकार्याचा विविधांगी आढावा घेणारे अभ्यासक हे एक प्रकारे तुकोबांच्या विचारपरंपरेतील टाळकरी आहेत. त्यांनी तुकोबांच्या जीवितकार्याकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. तुकोबांच्या कार्याचे आयाम स्पष्ट केले. तुकोबांची वैचारिक भूमिका, मांडणी आणि स्पष्टोक्ती यांचा नव्याने परिचय करून दिला. म्हणूनच काही मोजक्याच महत्त्वपूर्ण अभ्यासकांचा ग्रंथपरिचय प्रस्तुत लेखात करून दे...

दिल तो बच्चा है जी...

इमेज
  दिल तो बच्चा है जी...        वयाची पन्नाशी उलटून गेलीय. मन मात्र उमदे, उत्साही आहे. तारुण्यातील अवखळ खळखळाट आता राहिलेला नाही. वाहत्या पाण्यासारखे अनावर कोसळणे, तन-मनावर उमटणारे अनेक तरंग, एका विशिष्ट बिंदूकडे खेचणारे चुंबकीय भोवरे आता राहिलेले नाहीत. अधीरता संपलीय. जगण्याला थोडा संथपणा आलाय. प्रौढ प्रगल्भता जाणवते आहे. जीवनातील ऋतू बदलाचा हा काळ.      अशा संक्रमण काळात स्वतःचा मधाळ स्वर लाभलेली एक सुहास्यवदना अचानक सामोरी येते. तिच्या बोलण्या-चालण्यातून आत्मविश्वास झळकतोय. स्वतःचे निर्णय घेण्याची प्रगल्भता जाणवतेय. पहिली नजरानजर होते आणि जणू काही नजर गच्च रुतून बसते. प्रयत्न करूनही नजर तिच्यावरून क्षणभरही हटत नाही. आपल्या वयाला हे शोभत नाही, हे कळते. परंतु हृदयाची धडकन वाढते. ती थांबता थांबत नाही. स्थळ-काळ-वय यांचे बंधन झुगारून ते तिच्याकडे ओढ घेते. तिच्या परिपक्व व्यक्तित्वाने वेडावते. कदाचित आपले हसे होईल, फसगत होईल हे कळत असूनही हृदय ते जुमानत नाही. मग सुरू होते एका अनोख्या प्रेमभावनेची दास्ताँ!   ...