पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तू ही तो मेरी दोस्त है...!

इमेज
  तू ही तो मेरी दोस्त है...        मानवी नातेसंबंध हा कवी गुलजार यांच्या चिंतनाचा विषय आहे. नात्यातील प्रांजळपणा, दृढता, गहराई, ओलावा या गोष्टींचे महत्त्व अनन्यसाधारण असते. परंतु त्याची जाणीव होण्यासाठी वेळ लागतो. अनुभवातून चुकतमाकत अनेक गोष्टी शिकाव्या लागतात. आपले कोणीतरी जवळचे असावे, आपण कुणासाठी तरी जवळचे व्हावे, या गोष्टीचे मोल थोडे उशिरा लक्षात येते. कवी गुलजार सत्तरच्या दशकापासून आजपर्यंत आपल्या कवितांमधून, गाण्यांमधून विविध नात्यांचा पैस उलगडत आहेत.          ' हम ने देखी है उन आँखों की महकती ख़ुशबू, हाथ से छू के इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो।' असे एकेकाळी गुलजारजींनीच लिहिले होते. कारण त्या काळात स्त्री-पुरुषांची मैत्री, प्रेम, जवळीकता यांना समाजमान्यता नव्हती. नाती अंतःकरणापासून समजून घ्यावीत, जपावीत, पण त्यांना नाव देऊ नये. फक्त त्या नात्यातील प्रेम अनुभवावे, असा तो काळ! पण आता काळ बदलला आहे. समाजमन बदलले आहे. तरुणाई खुलेआम आपली मैत्री जाहीर करते. निभावते. कधी कधी मैत्रीचे प्रेमातही रूपांतर होते. हे सगळे समाजाने स्वीकार...

तुम आ गये हो...

इमेज
तुम आ गए हो...              जीवनसाथीची भेट हा प्रत्येकाच्या जीवनातील एक वळणबिंदू असतो. या जादुई भेटीनंतर जगण्याचे रंगरूप पालटते. जीवनाला चैतन्याचा, सौंदर्याचा स्पर्श होतो. एखाद्या शुष्क निष्प्राण पुतळ्याला प्रेमाचा स्पर्श व्हावा आणि तो साजिवंत होऊन सामोरा यावा, तसे काहीसे घडते. कवी गुलज़ारजींनी एका गीतामधून हे प्रत्ययकारी रितीने नोंदविले आहे. आँधी (१९७५) चित्रपटात संजीवकुमार आणि सुचित्रा सेन यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यात हे मधुर क्षण नजाकतीने टिपले आहेत. त्याच्या/तिच्या रूपाने मूर्तिमंत प्रेम जीवनात अवतरते. जीवनाला नवी झळाळी, नवे तेज, नवे सौंदर्य लाभते. या भेटीनंतरचा जीवनप्रवास आणि भेटीपूर्वीचा जीवनप्रवास या दोन अवस्था गुलज़ार साहेबांनी तंतोतंत टिपल्या आहेत.       जीवनाच्या विशिष्ट टप्प्यावर एक अस्पष्टसा चेहरा अधून मधून मनात डोकावत असतो. या चेहऱ्याचे भास होत राहतात, पण प्रत्यक्ष भेट होत नाही. ऋतू येतात, जातात. थोडीशी निराशा, थोडीशी उदासी मनावर दाटून येते. या आशानिराशेच्या संधिकालातच ...