संत एकनाथ लिखित संतचरित्रे
संत एकनाथ लिखित संतचरित्रे वारकरी संप्रदाय म्हणजे पूर्वपरंपरेशी केलेली स्वयंसिद्ध बंडखोरी! संत नामदेव-ज्ञानदेवांच्या काळात संप्रदायाला आचार विचार देण्याचे महद कार्य झाले. ते करत असताना संप्रदायात सर्वश्रेष्ठ स्थान म्हणून संतपद गौरविले गेले. वारकरी संप्रदायातील संत हे अनुभवसिद्ध आणि आदर्श कर्मयोगी होते. त्यांनी स्वतःचा व्यवसाय उद्योग केलाच, परंतु त्यासोबतच आपल्या सभोवताली अज्ञान अंधकारात बुडणाऱ्या लोकांविषयी कळवळा जपला. त्यांना सन्मार्ग दाखविला. ईश्वराशी कसे नाते जोडायचे ते शिकविले. 'यज्ञ याग विधी वायाची उपाधी', असे म्हणत आचरणसुलभ भक्तिमार्ग सांगितला. प्रयत्नपूर्वक वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. या संतांनी लिहिलेले वाङ्मय म्हणजे संप्रदायाला दिलेली आधारशीला होय. तत्कालीन सनातनी ब्रह्मवृंद या संतांना त्रास देत होता. छळत होता. त्यांच्या योग्यतेबद्दल शंका उपस्थित करीत होता. अशावेळी संत मंडळींची भलामन करणे गरजेचेच होते. म्हणून वारकरी संप्रदायातील संतांनी जाणीवपूर्वक आपल्या संतमंडळाचा गौरव केलेला दिसतो. ज्ञानेश्वरादी भावंडां...