पोस्ट्स

संत एकनाथ लिखित संतचरित्रे

इमेज
संत एकनाथ लिखित संतचरित्रे          वारकरी संप्रदाय म्हणजे पूर्वपरंपरेशी केलेली स्वयंसिद्ध बंडखोरी! संत नामदेव-ज्ञानदेवांच्या काळात संप्रदायाला आचार विचार देण्याचे महद कार्य झाले. ते करत असताना संप्रदायात सर्वश्रेष्ठ स्थान म्हणून संतपद गौरविले गेले. वारकरी संप्रदायातील संत हे अनुभवसिद्ध आणि आदर्श कर्मयोगी होते. त्यांनी स्वतःचा व्यवसाय उद्योग केलाच, परंतु त्यासोबतच आपल्या सभोवताली अज्ञान अंधकारात बुडणाऱ्या लोकांविषयी कळवळा जपला. त्यांना सन्मार्ग दाखविला. ईश्वराशी कसे नाते जोडायचे ते शिकविले. 'यज्ञ याग विधी वायाची उपाधी', असे म्हणत आचरणसुलभ भक्तिमार्ग सांगितला. प्रयत्नपूर्वक वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. या संतांनी लिहिलेले वाङ्मय म्हणजे संप्रदायाला दिलेली आधारशीला होय. तत्कालीन सनातनी ब्रह्मवृंद या संतांना त्रास देत होता. छळत होता. त्यांच्या योग्यतेबद्दल शंका उपस्थित करीत होता. अशावेळी संत मंडळींची भलामन करणे गरजेचेच होते. म्हणून वारकरी संप्रदायातील संतांनी जाणीवपूर्वक आपल्या संतमंडळाचा गौरव केलेला दिसतो. ज्ञानेश्वरादी भावंडां...

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप

ब्लॉग लेखन : संकल्पना व स्वरूप       स्मार्टफोन ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक क्रांतीच म्हणावी लागेल. त्यामुळे स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेट सुविधेचा वापर करणे सहज सोपे झाले. त्या पाठोपाठ अनेक प्रकारचे सोशल मीडिया म्हणजेच समाज माध्यमांच्या वापराचे पर्याय खुले झाले. यामध्ये व्हाट्सअप, इंस्टाग्राम, telegram, व्हिडिओ चॅनल, युट्युब, रिल्स, फेसबुक अशा अनेक सुविधा उपलब्ध झाल्या. त्यातीलच एक महत्त्वाची सुविधा म्हणजे ब्लॉग होय. सामान्यतः ज्या काळात छापील मासिके नियतकालिके निघत होती व अन्य पर्याय उपलब्ध नव्हते, त्या काळात फक्त मान्यवर गणले जाणारे लेखकच लिहू शकत होते आणि त्यांचे लेखन प्रकाशित होऊ शकत होते. सोशल मीडियाच्या काळात लिहायची उर्मी व इच्छाशक्ती असणारी प्रत्येक व्यक्ती लिहू लागली व तत्काळ विविध समाजमाध्यमांचा वापर करून प्रकाशित तसेच प्रसारित करू लागली. यामध्ये ब्लॉग लेखन हा सहज उपलब्ध होणारा चांगला पर्याय आहे.         ब्लॉग या शब्दाला मराठीत अनुदिनी किंवा जालपत्रिका किंवा जालनिशी असे पर्यायी शब्द आहेत. ब्लॉग (blog) हा शब्द वेब (web+log) लॉग...

कथाकथी (Story Telling)

कथाकथी (Story Telling)               गोष्टी रंगवून सांगणे आणि ऐकणे हे पूर्वापार चालत आलेले लोकसंचित आहे. गोष्टीवेल्हाळ माणसे नेहमीच इतरांना आवडतात. त्यांच्याकडे घटना, प्रसंग शब्दांच्या माध्यमातून साक्षात उभे करण्याचे सामर्थ्य असते. स्टोरी टेलिंग या इंग्रजी शब्दांसाठी मराठीत मात्र तीन भिन्न कृती अस्तित्वात असलेल्या दिसतात. त्या पुढील प्रमाणे : गोष्ट सांगणे             ही लोक परंपरेतील लोकप्रिय पद्धती आहे. अनेक जण सांगोवांगीच्या गोष्टी एकमेकांना ऐकवत असतात. यातील काही अनुभव खरे, काही खोटे असतात. मूळ घटनेला तिखट मीठ लावून रंजक बनविले जाते. या गोष्टींमधून नीती शिकविली जाते. बोध दिला जातो. या सांगितलेल्या लोककथा असतात. दंतकथा असतात. प्राणीकथा किंवा भुताखेताच्या गोष्टी देखील असतात. कधी कधी दैवतकथा देखील रंगवून सांगितल्या जातात. या सगळ्या गोष्टींचा कर्ता म्हणजेच लेखक अज्ञात असतो. एका अर्थी या गोष्टी म्हणजे समूहाची निर्मिती असते आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे लोककथांचे व दंतकथांचे संचित पोचविले जाते. समाजातील बुजुर्ग माण...

मराठी कादंबरी सूची : संशोधकांचा वाटाड्या

इमेज
मराठी कादंबरी सूची : संशोधकांचा वाटाड्या सूची व कोश वाङ्मय यांचे साहित्य अभ्यासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण कोणतीही साहित्यकृती किंवा लेखक यांचा सुटा सुटा विचार करता येत नाही. तसा अभ्यास करताना त्या वाङ्मय प्रकाराची साहित्यपरंपरा, विविध कालखंड, त्या कालखंडात प्रभावी असणाऱ्या विचारधारा, इझम यांचाही विचार करावा लागतो. लेखक आणि त्याची साहित्यकृती हे सामाजिक, सांस्कृतिक व वाङ्मयीन पर्यावरणाचे अपत्य असते. त्यामुळेच साहित्याचा समग्रदर्शी अभ्यास महत्त्वाचा ठरतो. अशा कामात जर विविध प्रकारच्या सूची उपलब्ध असतील, तर अभ्यासकाला सोयीचे होते आणि त्याचे संशोधनाचे काम गतीने होऊ शकते. या दृष्टीने विचार करता प्रा. डॉ. विनोद राठोड यांनी साकारलेली मराठी कादंबरी सूची प्रारंभ ते २०२३ ही अत्यंत महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. जवळजवळ दहा हजार कादंबऱ्यांची नोंद या सूचीमध्ये आहे. अनेक अपरिचित लेखक व त्यांच्या विस्मरणात गेलेल्या कादंबऱ्यांची नोंद या सूचीमध्ये आढळते. त्या दृष्टीने हा सूची ग्रंथ महत्वपूर्ण आहे. विशेषतः एम. फिल., पीएच.डी.चे संशोधक, वाङ्मयेतिहास लेखक, अभ्यासक यांना हा ग्रंथ उपयुक्त ठरणारा...

स्थलांतरित पक्षी (लेख)

इमेज
स्थलांतरित पक्षी  लेखावरील आपला अभिप्राय जरूर नोंदवा. संपादक हृदयनाथ सावंत यांना मनःपूर्वक धन्यवाद! 

रोज़ रोज़ आँखों तले

इमेज
रोज़ रोज़ आँखों तले       प्रेम नेमकं असतं तरी कुठं? समोरच्या व्यक्तीमध्ये की आपल्या मनात?  सहचराची एक अंधुक कल्पना अगोदर जागी होते, मग कुणीतरी आपल्या आसपास डोकावतं. हळूहळू त्याचं/तिचं आसपास असणं आवडू लागतं. प्रेमाचा रासवट दरवळ सभोवती पसरतो. तो/ती जवळ असताना जग विसरावं आणि जवळ नसताना त्याची/तिची स्वप्ने पहावीत, असा रमणीय काळ सुरू होतो. यावेळची भावस्थिती वर्णन करणं तसं कठीणच! पण गुलजारजींनी ही किमया साधली आहे एका सुमधुर गीतातून. जिवा (१९८६) चित्रपटाचे संगीतकार होते आर. डी. बर्मन. १९८० नंतरच्या हिंदी चित्रपटांतून संगीताचं भावस्पर्शी माधुर्य संपत चाललं होतं. पण चांगलं गीत हाती लागलं, तर पंचमदा त्यावर मेहनत घेत होते. त्यामधूनच भावनेची कोवळीक व गहनता असणारं हे मधुर गाणं निर्माण झालंय. आशा भोसले आणि अमित कुमार यांनी या गाण्यात प्राण ओतलाय. त्यामुळेच चित्रपट विस्मरणात गेला असला तरी गाणं मात्र जिवंत राहिलंय. प्रेमाची अनुभूती ही नेहमीच थोडीशी गोडसर अन् थोडीशी तीक्ष्ण, अस्सल मधासारखी! प्रेम या शब्दात जीवनही आहे अन् मरणही. प्रेम म्हणजे चैतन्य, प्रेम म्हणज...

छोड़ आए हम वो गलियाँ...

इमेज
छोड़ आए हम वो गलियाँ...        कवी गीतकार दिग्दर्शक गुलजार हे एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व. समाजाच्या वर्तमान प्रश्नावर वेगळ्या दृष्टिकोनातून भाष्य करणे ही त्यांची खासीयत. ' माचिस ' (१९९६) हा चित्रपट असाच एक वेगळा प्रयोग होता. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शिख आतंकवादी तरुणांना पकडण्याची जोरदार मोहीम हाती घेतली गेली. या प्रक्रियेत निष्पाप तरुण विनाकारण भरडले गेले. त्यांच्यावर अन्याय झाला. मग असे तरुण हिंसेच्या रस्त्यावरून पुढे गेले. अशाच भरकटलेल्या तरुणांची कहाणी म्हणजे 'माचिस' होय. काडीपेटी मधील काडीचा वापर चूल पेटवण्यासाठी होऊ शकतो, तसाच घर पेटविण्यासाठीही होऊ शकतो. हे ज्वलनशील युवक कुणाच्या हाती लागतात यावर पुढचे भवितव्य अवलंबून असते.        पोलीस आणि प्रशासनाच्या अन्यायाचा बदला घ्यायचा म्हणून चार तरुण स्वतःचे घरदार, गाव सोडून आतंकवाद्यांना मिळतात. अशा घरदार सोडलेल्या तरुणांच्या ओठी एक अतिशय अर्थपूर्ण गाणे आले आहे. 'छोड़ आए हम वो गलियाँ! ' गाण्याचा हा मुखडा तसा कुणालाही लागू पडणारा आहे. एका विशिष्ट ध्येयासाठी स्वतःचे घरदार, गाव सोडलेले तरुण...