पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फिर से आइयो बदरा बिदेसी

इमेज
 फिर से आइयो बदरा बिदेसी                    प्रेमभाव हा एकाच वेळी सर्जक आणि विध्वंसक देखील असतो. जेव्हा आपल्या प्रेमाला प्रतिसाद मिळतो आणि प्रेम परस्परांच्या अनुभूतीने साकार होते, तेव्हा प्रेम म्हणजे ऊर्जा-प्रेरणा-आनंद देणारे जीवनसंगीत ठरते. जीवनातील चांगुलपणावरचा विश्वास दुणावतो. याउलट जेव्हा प्रेमाला प्रतिसाद मिळत नाही, योग्य तो सन्मान मिळत नाही किंवा प्रेमाच्या नावाखाली फसवणूक होते, तेव्हा प्रेम विध्वंसक होते. मनस्वी प्रेम करणारी व्यक्ती स्वतःच कोलमडून जाते, निराश होते, उध्वस्त होते. तिचे आयुष्य म्हणजे दुःखाचे वैराण वाळवंट बनते. एकाच प्रेम भावनेची ही दोन स्वरूपाची परिणती असते.        खरे तर प्रत्येक संवेदनशील स्त्रीची अशी इच्छा असते की आपल्या सहचराने आपल्या भावभावना समजून घ्याव्यात. आपल्या इच्छा आकांक्षा सांगण्याची गरजच भासू नये. परंतु प्रत्यक्षात तसे घडत नाही. तो आपल्याच भावविश्वात इतका रममान झालेला असतो की त्याला तिच्या भावनांची दखल घ्यावी असे वाटत नाही. कधी कधी त्...

ऐ ज़िन्दगी गले लगा ले ...

इमेज
ऐ ज़िन्दगी गले लगा ले ...              सामान्य माणसाच्या जीवनाकडून असणाऱ्या अपेक्षा छोट्याशाच असतात. तो आपल्या वकुबानुसार स्वप्न पाहतो. ती पूर्ण होण्यासाठी धडपडतो. जीवाचे रान करतो. परंतु जीवन म्हणजे आशा-निराशेचा खेळ! सुखदुःखाची ऊनसावली आयुष्यभर येतजात राहते. जे हवंसं असतं ते प्राप्त होतंच असं नाही. जे नजरेसमोर असतं ते आपल्या हाती गवसतं असंही नाही. वाट्याला येणारे कटू अनुभव, अपयशाचे क्षण, दुःख म्हणजे जीवन नव्हे; तर आपली छोटी छोटी स्वप्ने पूर्ण होणे, खडतर वाटचालीतून यशापर्यंत पोहोचणे म्हणजे खरे जीवन! पण हे आनंददायी क्षण वाट्याला कधी आणि किती प्रमाणात येतील हे सांगता येत नाही. माणूस मात्र सतत अशा सुंदर मौल्यवान क्षणांची प्रतीक्षा करत राहतो.        कवी गुलजारजींनी ' सदमा'(१९८३ ) चित्रपटासाठी लिहिलेल्या एका गीतात हा जीवनानुभव खूप सूचक व अर्थपूर्णरित्या व्यक्त झालेला आहे. या गाण्यांमध्ये नायक आपल्या जीवनाशी संवाद साधतो आहे. आपली इच्छा अपेक्षा बोलून दाखवतो आहे. तो म्हणतो,  ऐ ज़िन्दगी गले लगा ले  हमने भी तेरे हर एक ग़म...

संत तुकारामांचे आधुनिक भाष्यकार

संत तुकारामांचे आधुनिक भाष्यकार        वारकरी ही एक जीवनप्रणाली आहे. संत हे या जीवनप्रणालीचे शिल्पकार आणि संत तुकाराम हे या जीवन प्रणालीचे संस्कृतिपुरुष! व्यक्तीला स्थळ काळाच्या मर्यादा असतात, परंतु त्याने निर्माण केलेले साहित्य आणि त्याचे जीवितकार्य या मर्यादा पार करून सर्वदूर पसरलेले असते. संत तुकारामांनी अनुभवप्रामाण्य स्वीकारून भक्तीच्या प्रांतात जे अलौकिक कार्य केले त्यामुळे उत्तरोत्तर महाराष्ट्राचा लोकधर्म घडत गेला. महाराष्ट्राची संस्कृती वारकरी संप्रदायाने व्यापलेले असल्यामुळे या संप्रदायातील कळस असणारे तुकोबा अनेक पिढ्यांना मार्गदर्शक आणि प्रेरक राहिले आहेत. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवितकार्याचा विविधांगी आढावा घेणारे अभ्यासक हे एक प्रकारे तुकोबांच्या विचारपरंपरेतील टाळकरी आहेत. त्यांनी तुकोबांच्या जीवितकार्याकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. तुकोबांच्या कार्याचे आयाम स्पष्ट केले. तुकोबांची वैचारिक भूमिका, मांडणी आणि स्पष्टोक्ती यांचा नव्याने परिचय करून दिला. म्हणूनच काही मोजक्याच महत्त्वपूर्ण अभ्यासकांचा ग्रंथपरिचय प्रस्तुत लेखात करून देण्यात येत आहे.  ...

तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी...

इमेज
तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी...       कवी गुलज़ारजींनी ' मासूम '(१९८३) चित्रपटासाठी एक अजरामर गीत लिहिले आहे, 'तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी... !' प्रत्येकाला कधी ना कधी भावलेले, स्वतःशी related वाटणारे हे गीत नसिरुद्दीन शाह व जुगल हंसराज वर चित्रित झालेले आहे. स्वतःच्या मुलाने विचारलेल्या निरागस प्रश्नांनी अस्वस्थ झालेला बाप या गाण्यामध्ये आहे. गाण्याचे चित्रपटातील संदर्भ वेगळे असतात, तर गाणे ऐकणाऱ्याच्या मनातील संदर्भ वेगळे असू शकतात.       आपल्या स्वतःच्या जीवनाबद्दल नाराज असणे योग्य नव्हे. आपण तसे नसतोही. परंतु कधी कधी जीवनात जे काही घडते त्यामुळे आपण हैराण होऊन जातो. आपल्या सरळमार्गी जीवनात नवीन वळणे येतात. नवे प्रश्न निर्माण होतात. साध्या आनंदी जीवनात उलथापालथ होते. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उपस्थित झालेले/विचारले गेलेले निरागस प्रश्न अस्वस्थ करतात. नकळत घडून गेलेल्या चुका, की ज्या टाळता आल्या असत्या; मुखातून जहरी बाणा प्रमाणे सुटलेले शब्द, की जे रोखता आले असते; त्याची खंत वाटू लागते. आपल्याला हे त्या त्या वेळेस का सुचले नाही? ...