पोस्ट्स

गीतगुंजन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

रोज़ रोज़ आँखों तले

इमेज
रोज़ रोज़ आँखों तले       प्रेम नेमकं असतं तरी कुठं? समोरच्या व्यक्तीमध्ये की आपल्या मनात?  सहचराची एक अंधुक कल्पना अगोदर जागी होते, मग कुणीतरी आपल्या आसपास डोकावतं. हळूहळू त्याचं/तिचं आसपास असणं आवडू लागतं. प्रेमाचा रासवट दरवळ सभोवती पसरतो. तो/ती जवळ असताना जग विसरावं आणि जवळ नसताना त्याची/तिची स्वप्ने पहावीत, असा रमणीय काळ सुरू होतो. यावेळची भावस्थिती वर्णन करणं तसं कठीणच! पण गुलजारजींनी ही किमया साधली आहे एका सुमधुर गीतातून. जिवा (१९८६) चित्रपटाचे संगीतकार होते आर. डी. बर्मन. १९८० नंतरच्या हिंदी चित्रपटांतून संगीताचं भावस्पर्शी माधुर्य संपत चाललं होतं. पण चांगलं गीत हाती लागलं, तर पंचमदा त्यावर मेहनत घेत होते. त्यामधूनच भावनेची कोवळीक व गहनता असणारं हे मधुर गाणं निर्माण झालंय. आशा भोसले आणि अमित कुमार यांनी या गाण्यात प्राण ओतलाय. त्यामुळेच चित्रपट विस्मरणात गेला असला तरी गाणं मात्र जिवंत राहिलंय. प्रेमाची अनुभूती ही नेहमीच थोडीशी गोडसर अन् थोडीशी तीक्ष्ण, अस्सल मधासारखी! प्रेम या शब्दात जीवनही आहे अन् मरणही. प्रेम म्हणजे चैतन्य, प्रेम म्हणज...

छोड़ आए हम वो गलियाँ...

इमेज
छोड़ आए हम वो गलियाँ...        कवी गीतकार दिग्दर्शक गुलजार हे एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व. समाजाच्या वर्तमान प्रश्नावर वेगळ्या दृष्टिकोनातून भाष्य करणे ही त्यांची खासीयत. ' माचिस ' (१९९६) हा चित्रपट असाच एक वेगळा प्रयोग होता. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शिख आतंकवादी तरुणांना पकडण्याची जोरदार मोहीम हाती घेतली गेली. या प्रक्रियेत निष्पाप तरुण विनाकारण भरडले गेले. त्यांच्यावर अन्याय झाला. मग असे तरुण हिंसेच्या रस्त्यावरून पुढे गेले. अशाच भरकटलेल्या तरुणांची कहाणी म्हणजे 'माचिस' होय. काडीपेटी मधील काडीचा वापर चूल पेटवण्यासाठी होऊ शकतो, तसाच घर पेटविण्यासाठीही होऊ शकतो. हे ज्वलनशील युवक कुणाच्या हाती लागतात यावर पुढचे भवितव्य अवलंबून असते.        पोलीस आणि प्रशासनाच्या अन्यायाचा बदला घ्यायचा म्हणून चार तरुण स्वतःचे घरदार, गाव सोडून आतंकवाद्यांना मिळतात. अशा घरदार सोडलेल्या तरुणांच्या ओठी एक अतिशय अर्थपूर्ण गाणे आले आहे. 'छोड़ आए हम वो गलियाँ! ' गाण्याचा हा मुखडा तसा कुणालाही लागू पडणारा आहे. एका विशिष्ट ध्येयासाठी स्वतःचे घरदार, गाव सोडलेले तरुण...

दिल हूम हूम करे...

इमेज
दिल हूम हूम करे...        राजस्थानचे वैराण वाळवंट तिच्या डोळ्यात उतरलेलं आहे. तिचे डोळे कोरडे ठक्क. त्या वाळवंटासारखेच. थोडाही ओलावा नाही. ती शनिवारी जन्मली म्हणून शनिचरी. तिचा जन्म झाला आणि बाप मेला. आई नौटंकीवाल्या बरोबर पळून गेली. म्हणून ती कलमुही. असेच कुणीतरी लहानाचे मोठे केले. एका दारुड्याने तिला पैजेत जिंकले आणि तिच्याशी लग्न केले. तिला एक मुलगाही झाला, तो बुधवा. दोन वेळचं अन्न कधी नीट मिळालं नाही. खालच्या जातीची, तशात अपशकुनी म्हणून अवहेलना अपमान नेहमीचाच.      अशातच एकदा दूर वरून पाणी घेऊन येत असताना तो भेटतो. ती वाळवंटातून लांबून थोडे पाणी माठातून आणतेय. तो उंटावरून चाललाय. तिला थांबवून पाणी मागतोय. तिला वर बघून बोल म्हणतोय. नजरेत नजर मिळवायला सांगतोय. तो लक्ष्मणसिंग ठाकूर आहे. जमिनदार. उच्च जातीचा. श्रीमंत. उंच हवेलीत राहणारा. ती दरिद्री. कमजात. ती त्याला पहिल्याच भेटीत आवडते.         तो तिला हवेलीत कामाला यायला सांगतोय. ती येते. तो तिला एकटीला गाठून आपला प्रेमभाव व्यक्त करतोय. तिला स्पर्श करतोय. नवरा मुलाला स...

फिर से आइयो बदरा बिदेसी

इमेज
 फिर से आइयो बदरा बिदेसी                    प्रेमभाव हा एकाच वेळी सर्जक आणि विध्वंसक देखील असतो. जेव्हा आपल्या प्रेमाला प्रतिसाद मिळतो आणि प्रेम परस्परांच्या अनुभूतीने साकार होते, तेव्हा प्रेम म्हणजे ऊर्जा-प्रेरणा-आनंद देणारे जीवनसंगीत ठरते. जीवनातील चांगुलपणावरचा विश्वास दुणावतो. याउलट जेव्हा प्रेमाला प्रतिसाद मिळत नाही, योग्य तो सन्मान मिळत नाही किंवा प्रेमाच्या नावाखाली फसवणूक होते, तेव्हा प्रेम विध्वंसक होते. मनस्वी प्रेम करणारी व्यक्ती स्वतःच कोलमडून जाते, निराश होते, उध्वस्त होते. तिचे आयुष्य म्हणजे दुःखाचे वैराण वाळवंट बनते. एकाच प्रेम भावनेची ही दोन स्वरूपाची परिणती असते.        खरे तर प्रत्येक संवेदनशील स्त्रीची अशी इच्छा असते की आपल्या सहचराने आपल्या भावभावना समजून घ्याव्यात. आपल्या इच्छा आकांक्षा सांगण्याची गरजच भासू नये. परंतु प्रत्यक्षात तसे घडत नाही. तो आपल्याच भावविश्वात इतका रममान झालेला असतो की त्याला तिच्या भावनांची दखल घ्यावी असे वाटत नाही. कधी कधी त्...

तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी...

इमेज
तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी...       कवी गुलज़ारजींनी ' मासूम '(१९८३) चित्रपटासाठी एक अजरामर गीत लिहिले आहे, 'तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी... !' प्रत्येकाला कधी ना कधी भावलेले, स्वतःशी related वाटणारे हे गीत नसिरुद्दीन शाह व जुगल हंसराज वर चित्रित झालेले आहे. स्वतःच्या मुलाने विचारलेल्या निरागस प्रश्नांनी अस्वस्थ झालेला बाप या गाण्यामध्ये आहे. गाण्याचे चित्रपटातील संदर्भ वेगळे असतात, तर गाणे ऐकणाऱ्याच्या मनातील संदर्भ वेगळे असू शकतात.       आपल्या स्वतःच्या जीवनाबद्दल नाराज असणे योग्य नव्हे. आपण तसे नसतोही. परंतु कधी कधी जीवनात जे काही घडते त्यामुळे आपण हैराण होऊन जातो. आपल्या सरळमार्गी जीवनात नवीन वळणे येतात. नवे प्रश्न निर्माण होतात. साध्या आनंदी जीवनात उलथापालथ होते. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उपस्थित झालेले/विचारले गेलेले निरागस प्रश्न अस्वस्थ करतात. नकळत घडून गेलेल्या चुका, की ज्या टाळता आल्या असत्या; मुखातून जहरी बाणा प्रमाणे सुटलेले शब्द, की जे रोखता आले असते; त्याची खंत वाटू लागते. आपल्याला हे त्या त्या वेळेस का सुचले नाही? ...

दो नैना, एक कहानी...

इमेज
दो नैना, एक कहानी...             दुःखाचा स्वतःचा एक स्वर असतो. तो बोलला जात नाही, तरीही ऐकता जातो. वेदना लिहिली जात नाही, तरीही वाचली जाते. बहुसंख्य वेळेला ओठ काही बोलत नाहीत. पण डोळे? ते तर सगळंच सांगतात. आनंदही... दुःखही... ! खंतही... वेदनाही...! न बोलताही व्यक्त झालेली दुःखाची ही परिभाषा फक्त संवेदनशील जिवलग वाचू शकतो. समजू शकतो. आणि योग्य तो प्रतिसाद देऊ शकतो. स्त्रियांच्या वाट्याला अकल्पितपणे विविध स्वरूपात येणारे दुःख फार तीव्र स्वरूपाचे असते. परंतु बऱ्याच वेळेला ते नेमकेपणाने व्यक्त होत नाही, व्यक्त केले जाऊ शकत नाही. त्यांच्या दुःखाची कहाणी फक्त त्यांच्या डोळ्यातच वाचता येते.        कवी गुलजारजींनी ' मासूम' (१९८३ ) चित्रपटासाठी लिहिलेल्या एका गीतात हाच स्त्रीदुःखाचा भाव नेमकेपणाने व्यक्त केला आहे.  दो नैना, एक कहानी  थोड़ा सा बादल, थोड़ा सा पानी और एक कहानी दोन डोळ्यांमधून एक दुःखाची कहाणी व्यक्त होतेय. कोठेतरी वेदनेचा एक ढग दाटून आलाय. पापण्यांच्या कडांवर अश्रू ओथंबलेत. त्यामागे एक दुःखभरी दास्तां दडली...

यारा सीली सीली...

इमेज
 यारा सीली सीली...             अत्यंत प्रिय व्यक्ती किंवा स्थळ किंवा काळ यांच्या वियोगाचे दुःख म्हणजे विरह. विरहाचे नाते हे नेहमी आत्ममग्नतेशी असते. जीवनातील अत्यंत आवडणारी व्यक्ती दुरावली किंवा अत्यंत आवडते स्थळ दुरावले किंवा अत्यंत आवडता काळ नकळत हातून निसटून गेला, याचे ते दुःख असते. या विरह वेदनेतून लवकर मुक्ती नसते. किंचित उबदार गोडसर असणाऱ्या या विरह भावनेतून संवेदनशील माणूस लवकर बाहेर पडत नाही. स्थळ-काळ-व्यक्तींच्या प्रिय आठवणीतच तो रमतो. त्याचे मन तिथेच घुटमळत राहते. त्या भावूक करणाऱ्या आठवणी गुंतवून ठेवतात. त्या भावओल्या आठवणींमध्ये धुपत धुपत जळत जाणे वाट्याला येते.        कवी गुलज़ारजींनी 'लेकिन'(१९९१) चित्रपटासाठी लिहिलेल्या एका गाण्यामध्ये ही अवस्था नेमकेपणाने पकडली आहे.  यारा सीली सीली बिरहा की रात का जलना यारा सीली सीली, यारा सीली सीली          विरहाची रात्र म्हणजे एकटेपणाची रात्र. अशा रात्री ना धड झोप येते, ना धड जीवाला चैन पडते. त्याच्या आठवणीने, त्याच्यासोबत घालवलेल्या ...

बीती ना बिताई रैना...

इमेज
बीती ना बिताई रैना...              वेदना हे जीवनाचे अभिन्न अंग आहे. ज्या पद्धतीने जगावे असे वाटते, तसे जीवन वाट्याला येईल याची कोणतीच शाश्वती नसते. विशेषतः अगदी हृदयाजवळ असणारी प्रिय माणसे नेहमीच सोबत हवी असतात, परंतु काळ कठोर असतो. तो कधी कोणाला कोणत्या पद्धतीने आपल्यापासून दूर करेल, हे सांगता येत नाही. मग अशा दुरावलेल्या प्रियजनांच्या आठवणी शिल्लक राहतात. विरहाची कधीच न विझणारी वेदना अंत:करणात जळत राहते. आपले प्रिय म्हणजे जणू आपले प्राणच! हे प्राण निघून गेल्यानंतर उरते ते फक्त शरीर. या विरहकाळात दिवस कसाबसा निघून जातो, परंतु रात्र अधिक अंधारी होते. भिवविते. निराशेच्या खोल गर्तेत घेऊन जाऊ पाहते.      गुलजारजींनी ' परिचय '(१९७३) चित्रपटासाठी लिहिलेले प्रस्तुत गाणे म्हणजे वेदनेचा कातर करून सोडणारा स्वर आहे. शास्त्रीय संगीतात रममाण झालेला जमीनदाराचा मुलगा नीलेश (संजीव कुमार) आपला छंद हट्टाने जोपासतो. त्यासाठी त्याला वडिलांची हवेली सोडावी लागते. तो संगीत शिकतो आणि अकस्मात संगीतगुरूच्या मृत्यूनंतर त्य...

दिल ढूंढ़ता है

इमेज
दिल ढूंढ़ता है        प्रेम ही एक उत्कट सदाबहार अनुभूती आहे. प्रेम व्यक्त करायला आणि अनुभवायलाही वेळ द्यावा लागतो. एकमेकांसोबत तासन् तास, दिवसच्या दिवस फुरसतीत घालवावे लागतात. थोडे रुजू द्यावे लागते, थोडे मुरू द्यावे लागते. मग प्रेमानुभूतीत अंत:करणातली गोडी उतरत राहते. परस्परांच्या प्रेमात घालविलेले मधुर दिवस आणि जागवलेल्या रात्री यांची गोडी अवीट असते. माणसाच्या जीवनातील अनमोल ठेवा असतात या आठवणी! नंतर पुन्हा पुन्हा त्या जुन्या उत्कट आठवणीत मन रमून जाते. त्या आठवणींचे मोल, त्याची गोडी, त्याचे सौंदर्य फक्त ते अनुभवणाऱ्यालाच अधिक सखोलतेने जाणवत राहते. कधीच संपू नयेत असे हे अनमोल क्षण असतात. परंतु जीवनव्यवहारात इतरही जबाबदाऱ्या असतात. त्यामध्ये हे सोनेरी क्षण हरवून जातात. काळ भरभर पुढे सरकतो. मग  उरतात त्या फक्त आठवणी! भाव मधुर क्षणांच्या! जिवलग सहचरांच्या!         कवी गुलजार यांनी एका सदाबहार गीतातून ही अनमोल अनुभूती पकडली आहे. उर्दूचे महाकवी मिर्झा गालिब हे गुलजारजींचे आवडते शायर आहेत. त्यांच्या एका शेरन...

हज़ार राहें

इमेज
हज़ार राहें        चित्रपटामध्ये काही गाणी स्वतंत्र असतात, तर काही गाणी घटना प्रसंगांवर बेतलेली (Theme song) असतात. अशा गाण्यांमध्ये चित्रपटाचा सार सामावलेला असतो. 'थोडी सी बेवफाई' या चित्रपटात गुलजारजींनी लिहिलेले एक गीत अशाच धाटणीचे आहे.         प्रेम आणि अहंकार या गोष्टी एकत्र नांदू शकत नाहीत. काही वेळेला चुकीच्या गोष्टीसाठी केलेला हट्ट देखील प्रेमभावनेला धक्का पोहोचवतो. खरे तर प्रेमात पडल्यानंतर परस्परांच्या स्वभावातले दोष कमी व्हायला हवेत. दोन जिवलगांनी आपल्याला नको वाटणाऱ्या, बोचणाऱ्या गोष्टी हळुवारपणाने परस्परांना सांगायला हव्यात. आणि त्या कमी व्हाव्यात यासाठी प्रयत्नही करायला हवा. काही वेळेला पती-पत्नीच्या प्रेमात बाधक ठरते ते माहेरचे चुकीच्या गोष्टीसाठी दिले गेलेले पाठबळ. राग, गैरसमज, ताठा या गोष्टींमुळे एकमेकांवर प्रेम असूनही दोन प्रेमी जीव एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात. त्यामुळे रंगाचा बेरंग होऊ शकतो.        ' थोड़ी सी बेवफाई ' (१९८०) हा चित्रपट देखील अशाच गृहकलहावर बेतलेला आहे...

आप की आँखों में कुछ...

इमेज
      आप की आँखों में कुछ...          प्रेम ही सौंदर्यात्मक भावना आहे. हे सौंदर्य असते मनाचे, आदरयुक्त आत्मीयतेचे. ते व्यक्त होताना मात्र शारीर संकेतांच्या स्वरूपात दिसू लागते. उत्फुल्ल स्वरूपात प्रकटते. अंतरंगात कमलिनी सारखे उमलणारे प्रेम नजरेतून स्रवते. हसण्यातून दरवळते. लयबद्ध हालचालीतून ओसंडते. या प्रेमभावनेचे वर्णन करताना अनेक कवी देहसौंदर्याचे वर्णन करतात. परंतु त्या सुंदर दिसणाऱ्या देहामध्ये तितकेच सुंदर मन आहे, हे विसरतात. कवी गुलज़ारजींनी मात्र एका गाण्यात बाह्य सौंदर्याबरोबरच आंतरिक सौंदर्याचेही वर्णन केले आहे.         पाणीदार, गहनगहिरे डोळे हे सौंदर्यही आहे आणि भावनांची आरासही! डोळे खूप काही सांगून जातात, फक्त ते वाचता आले पाहिजे. अपेक्षा अशी असते की आपल्या प्रियवराने न सांगताही आपल्या भावना समजून घ्याव्यात. त्या भावभावना जाणून घेण्याचा एकमेव मार्ग असतो डोळे! ज्याला ही डोळ्यांची भाषा कळते त्याला मनातील हर्षखेदही कळतात. त्यातूनच सहजीवनाची रंगत वाढत जाते. म्हणूनच 'घर' चित्र...

मेरी आवाज़ ही पहचान है

इमेज
मेरी आवाज़ ही पहचान है       मानवी जीवन म्हणजे अकल्पित वास्तवाचा पसारा. जे आज आहे ते कायम असेलच असे नाही. जे हवे असते ते मिळेलच असेही नाही. सगळ्याच गोष्टी अनित्य. सतत बदलणाऱ्या. जे हवेसे असते ते आपल्या नजरेसमोरून हरवून जाते. जे समोर येते ते सहजपणे स्वीकारता येत नाही. हाच काळाचा नियम आहे.      आयुष्य नेहमीच माणसाशी खेळ खेळत असते. ते कधी कधी आवडत्या व्यक्तींना लपवून ठेवते आणि त्या ठिकाणी दुसऱ्याच व्यक्तींचा प्रवेश होतो. खरे तर एका व्यक्तीची जागा दुसरी व्यक्ती कधीच घेऊ शकत नाही. काहीतरी उणेदुणे असतेच. तरीही एक तडजोड म्हणून, आयुष्याने आपल्यासमोर ठेवलेला पर्याय म्हणून, जे वाट्याला आले ते स्वीकारावे लागते. मग सुरू होतो नव्यामध्ये जुने शोधण्याचा खेळ. आधाअधुरा. पूर्णत्वाचे समाधान कधीच न देणारा. भूतकाळाची पडछाया नेहमीच वर्तमानावर पडलेली असते. त्या सावल्या मनभर रेंगाळतात. हृदयाशी घट्ट बिलगून बसतात. त्याच वेळी दुसरा आश्वासक स्वरही कानावर पडत असतो. जीवनाचा प्रवाह कधीच एका ठिकाणी थांबत नाही. म्हणूनच नव्याला स्वीकारावे लागते. त्याच वेळी कानावर काही जुने...

इस मोड़ से जाते हैं...

इमेज
इस मोड़ से जाते हैं...      ' आंधी ' (१९७५) हा गुलज़ारजीनी लिहिलेला व दिग्दर्शित केलेला चित्रपट जीवनाच्या अकल्पित प्रवासाबद्दल खूप काही सांगून जातो. संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांच्या मुख्य भूमिका असलेेला हा चित्रपट. या चित्रपटातील गाणी त्या काळात गाजली होती. त्यामधील मनात घर केलेले एक गाणे म्हणजे 'इस मोड़ से जाते हैं...'         मानवी जीवन अनेक चढउतारांनी भरलेले आणि अनेक वाटा-वळणे असलेले असते. कधी कधी जीवनात असे वळण येते की, त्यामुळे पुढचा रस्ताच बदलून जातो. आणि जो रस्ता आपण निवडतो तो आपल्याला संकल्पित मुक्कामापर्यंत घेऊन जातोच असे नाही. तरीही चालणे थांबवता येत नाही. ज्या रस्त्यावरून आपण चालतो तो रस्ता नाकारता येत नाही.        जीवनातील वळणबिंदूपासून पुढे जाताना धीम्या गतीने स्वतःच्या तंद्रीत पुढे जाणारा एक रस्ता लागतो. त्याच वेळी वेगात धावणाऱ्या दुसऱ्या वाटाही लागतात. कोणत्या रस्त्यावरून जायचे ते आपल्यालाच ठरवायचे असते. धीम्या गतीने जाताना जीवनाचा आनंद घेता येतो. हवे तिथे थांबता येते. रस्त्याचा आणि आजूबाजूचा परिसर न...

ना जिया लागे ना...

इमेज
 ना जिया लागे ना...       प्रेम म्हणजे अद्भुत जीवनरस! अखंड वाहता. प्रवाही. निर्झरासारखा झुळझुळणारा. त्याचा मंद स्वर जीवनसंगीत बनून राहतो. जगण्याला नवी उमेद, नवी ऊर्जा देतो. प्रेम परिसासारखे असत नाही. एकदा परिसाचा लोखंडाला स्पर्श झाला आणि त्याचे सोने झाले, की मग परिसाचे कामच संपले. असे प्रेमाच्या बाबतीत असत नाही. प्रेम निरंतर हवे हवेसे असते. ते नित्यनूतन असते. समंजस आणि प्रगाढ प्रेमाची गोडी दिवसेंदिवस अधिक मधुर होत जाते.       या प्रेमाच्या अनेक तऱ्हा असतात. अनेक छटा असतात. ते कधी भांडणातून, कधी रुसण्यातून, कधी विरहातूनही व्यक्त होते. सहचराचा अल्पकालीन विरह देखील कधी कधी असह्य होतो. मन कुठेच लागत नाही. देह कामात गुंतलेला आणि मन बावरे झालेले, अशी अवस्था होते. अनामिक हुरहुर जीवाला लागून राहते. अस्वस्थता आणि अधीरता यांनी मन व्याकूळ होते. नजर पुन्हा पुन्हा येणाऱ्या वाटेकडे लागून राहते.          कवी गुलजार यांनी ही भावस्थिती एका गाण्यात नेमकी पकडली आहे. ' आनंद ' (१९७१) चित्रपटातील ...

हम ने देखी है उन आँखों की महकती ख़ुशबू

इमेज
  हम ने देखी है उन आँखों की महकती ख़ुशबू               गुलजारजींनी लिहिलेल्या गीतांपैकी माझे आवडते एक गीत 'खामोशी' (१९६९) चित्रपटामध्ये आहे. लता मंगेशकर यांचा जादुई आवाज, हेमंत कुमार यांचे संगीत आणि गुलजारजींचे अप्रतिम शब्द यांनी गाण्याला अजरामर केले आहे. या गाण्याचे बोल असे आहेत :         हम ने देखी है उन आँखों की महकती ख़ुशबू         हाथ से छू के इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो         सिर्फ़ एहसास है ये रूह से महसूस करो         प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो।         प्रेम ही जगातील सर्वांग सुंदर भावना! या भावनेला अनेकांनी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. गुलजारजी यांमध्ये अव्वल ठरतात. प्रेमाची पहिली रसरशीत जाणीव डोळ्यातूनच मुखर होते. जणू काही प्रेम भावनेचा उद्भव झाल्यावर डोळे सुगंधित होतात. एक अनवट गंध या फुलून आलेल्या डोळ्यांमधून दरवळतो. खरे तर या मनस्वी प्रेमाला कोणी हाताने स्पर्श करू नये. त्यावर मालकी हक्क दाखवू नये. कोणते...